मंगळवार, २६ मार्च, २०२४

पीठ मिरची !!


 पीठ मिरची !!

तिखट मिरची चे बारीक काप करून घ्या . एका काळ्या वाटीत नेहमीप्रमाणे फोडणी करून त्यात हे मिरचीचे काप टाका. आता ह्या तेलात बसेल एवढेच चणाडाळीचे पीठ पेरा .अगदी ४-५ थेंब पाणी घाला . वाफ येऊ द्या आणि पीठ मिरची तयार. आपण मिठभुरका करतो त्यातलाच हा प्रकार आहे.हि रेसिपी मी आईंकडून शिकले. 



टिफिन सांबार

 सांबार मधून भाज्या बाजूला काढणाऱ्या द्वाड मुलांसाठी झटपट होणारी फक्कड रेसिपी....



टिफिन सांबार 

सांबार मध्ये एरवी घालता त्या भाज्या म्हणजे बटाटे ,दुधी ,लाल भोपळा ,टोमॅटो ,वांगी ,शेवगा आणि हव्या त्या कुकर मध्ये थोडेसे पाणी घालून  शिजवून घ्या . डाळ घालावीच असे काही नाही . २ शिट्ट्या झाल्या आणि कुकर थंड झाला कि कुकर उघडुन त्यातले पाणी वेगळे करून ,भाज्या चांगल्या स्मॅश करून घ्या . एका कढईत नेहमीचीच फोडणी जसे तेल,मोहरी ,हिंग जिरे करून त्यात स्मॅश केलेल्या भाज्या घाला . हळद ,तिखट आणि सांबर मसाला घालुन भाजी छान परतून घ्या. आधी भाज्यामधून वेगळे केले होते ते पाणी ह्यात ऍड करा.वरून कोथिंबीर घालून छान  उकळी येऊ द्या आणि गरमागरम इडलीबरोबर मस्त सर्व करा. 

                                            

बुधवार, १३ मार्च, २०२४

Tears

 When alone,

I shed some tears,

I know now,

I can't do more.


I think and,

I miss and,

I pity myself,

But then I,

Gather me

To play,

The game,

Called Everyday


I know,

You may,

Feel different,

Than me,

Oh you must,

M sure,

Then alone,

I shed,

Some tears,

Coz I know,

I can't do more.

मंगळवार, १२ मार्च, २०२४

Rutuchakra

         प्रत्येक ऋतूचं वेगळंच महत्त्व आहे . ऋतु सरत आला की हवाहवासा वाटतो . मला सरत आलेली थंडी आणि येऊ घातलेला उन्हाळा हा काळ नेहमीच आवडतो . हा काळ म्हणजे साधारण जानेवारी ते मार्च . काही वेगळाच उत्साह आहे ह्या काळात . थंडी नको नको होत असते आणि हळुहळु उन्हाळ्याची चाहूल लागत असते . म्हणजे सकाळी आणि रात्री थंडी आणि दुपारी उन्हाळ्याचं पण चटका न देणारं ऊन असतं .सूर्यास्त मस्त दिसायला लागतो . दिवस मोठा होत असतो . हा एवढा मोठा दिवस कसा कसा सत्कारणी लावायचा ह्याचं प्लँनिंग आपण करत असतो . ह्या दिवसात बरीच कामं होतात . माझी तरी . उन्हाळा सरत आल्यावरही पाहा पावसाची चाहूल लागते . मग पाऊस बास आता होतो आणि थंडी येते. आणि हे ऋतुचक्र असंच चालत राहतं . आपल्याला नव्या आशा देत. निसर्गालाही बदल हवा असतो . तसाच आपल्यालाही . जरा बदल केला की उत्साह वाढतो . बघुया मग जरा बदल करुन आपणही . इप्सित नक्कीच साध्य होणार .