सोमवार, २२ एप्रिल, २०२४

पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि ॥

 योगेन चित्तस्य पदेन वाचां ।

मलं शरीरस्य च वैद्यकेन ॥

योऽपाकरोत्तमं प्रवरं मुनीनां ।

पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि ॥


अर्थ -

योगाने चित्ताचा , पदाने व्याकरणाचा,वाणीचा,भाषेचा व वैद्यक शास्त्राने शरीराचा मल (अशुद्धता ) ज्यांनी दूर केलेला आहे अश्या मुनीश्रेष्ठ पतंजलींना दोन्ही हात जोडून,नतमस्तक होऊन नमस्कार करत आहे 


-राजा भर्तृहरी 

शुक्रवार, १९ एप्रिल, २०२४

Gratitude towards nature


 

Gratitude towards hands when you wake up.You do it right when you wake up in the bed itself.

Kara-Agre Vasate Lakssmiih Kara-Madhye Sarasvatii |
Kara-Muule Tu Govindah Prabhaate Kara-Darshanam ||

Meaning:
1: At the Top of the Palm dwell Devi Lakshmi, and at the Middle of the Palm dwell Devi Saraswati,
2: At the Bottom of the Palm dwell Sri Govinda; Therefore one should Look at one's Palms in the Early Morning and contemplate on Them.

 

Gratitude towards land.

Samudra-Vasane Devi Parvata-Stana-Mannddale |
Vissnnu-Patni Namas-Tubhyam Paada-Sparsham Kssamasva-Me ||

Meaning:
1: (Oh Mother Earth) O Devi, You Who have the Ocean as Your Garments, and Mountains as Your Bosom,
2: O Consort of Lord VishnuSalutations to You; Please Forgive my Touch of the Feet (on Earth, which is Your Holy Body)

 

Gratitude towards rivers while bathing

Gangge Ca Yamune Cai[a-E]va Godaavari Sarasvati |
Narmade Sindhu Kaaveri Jale-
[A]smin Sannidhim Kuru ||

Meaning:
1: O Holy Rivers Ganga and Yamuna, and also Godavari and Saraswati,
2: O Holy Rivers NarmadaSindhu and Kaveri; Please be Present in this Water (and make it Holy)

बुधवार, ३ एप्रिल, २०२४

स्वातंत्र्यवीर सावरकर ...

 

स्वातंत्र्यवीर सावरकर ... 


आधी तर ना ते 'स्वतंत्रवीर सावरकर ' म्हणणं बंद करा हो .. 'स्वातंत्र्यवीर' म्हणा . दोन reviews देईन ..एक चित्रपट म्हणून आणि एक घटना म्हणून 

चित्रपट म्हणजे कलाकृती म्हणुन ठीक आहे ..अजून चांगला होऊ शकला असता.. पहिला भाग फार फास्ट वाटला ..ज्यांना तो इतिहास माहित आहे ..मदनलाल धिंग्रा ,खुदिराम बोस ,चापेकर बंधु वेगैरे त्यांना कळेल पण मुलांना हे सगळं माहित नाही सो त्यांच्यासाठी फास्ट आहे .. 

रणदीप हुड्डा चांगला ऍक्टर आहेच..वि दा  म्हणुन शोभुन दिसलाय अगदी.  त्याचं विशेष कौतुक ह्या विषयावर लेखन,दिग्दर्शन आणि निर्मिती केल्याबद्दल .. सेकंड हाफ  खिळवून ठेवणारा आहे आणि शेवट पण  छान.माहित नसलेला आणि माहित असावा असा.  

आता घटना म्हणुन अभिप्राय .घटना ,डायलॉग्ज ,सुसूत्रता छान दाखवली आहे . सावरकरांना शिक्षा झाली नसती तर? तर  त्यांचा स्वातंत्र्यसंग्रामाला खुपच चांगला हातभार लागला असता हे पटले.इतिहास काही वेगळा असता . ते लंडन ला गेले नसते आणि भारतातच राहिले असते तर बरे झाले असते असेही  वाटले एकवेळ . पण बाबारावांनी अभिनव भारत सांभाळले म्हणुन त्यांना सावरकरांच्या आधी काळ्यापाण्याची शिक्षा झालीच ना .म्हणजे ते प्रारब्धच होते . त्यांनी लंडन मध्ये शिक्षण पुर्ण करून कार्य करायला हवे होते का . कामाचे स्वरुप जरा वेगळे ठेवले असते तर..असे बरेच विचार मनात येऊन गेले . पण ते टिळक प्रेरित होते म्हणून काहीही झाले तर ते क्रांतिकारकच  राहिले असते . सावरकरांच्या बायकोचा संघर्ष फार उठुन दाखवण्यात आला नाही चित्रपटात . ते बऱ्याच पुस्तकांमधून छान मांडलेले आहे . 

पोलिटिकल प्रिजनर्सची शिक्षा माफ व्हावी ही विनंती रास्तच होती .त्याची कारणेही रास्त होती .बघा ना सावरकर कैदेत राहिल्यामुळे आपण त्यांच्या ज्ञानापासून दुरापास्तच राहिलो . त्या शब्दात ब्रिटिशांना पत्र लिहिणे हि काळाची गरज होती हे चित्रपटात पटावे असे सादर केले आहे . आपण एखाद्या घटनेचे नाटकी रूपांतरण पाहतो तेव्हा घटना व्यवस्थित कळते. हे ह्या चित्रपटानेही साध्य केले आहे . शिवाय कसला भपकेबाजपणा नाही कि मोठेपणा नाही . फक्त एक.  'ने मजसी ने' आणि त्यांच्या काही कविता जश्याच्या तश्या घातल्या असत्या तर ह्या मराठी मनाला काय छान वाटले असते अहाहा .. 

बघून या मग चित्रपट..कि नेटफ्लिक्स वर येण्याची वाट पाहताय?